Friday, September 11, 2020

संवाद


“ओळखलंस का गं मला?” म्हणून मेसेज केला कोणी

 माणसे तीच जुनी पण ओळख होतेय नव्यानी


क्षणभर केला विचार,  कुणी काही का म्हणेना

सगळ्यांशी मी बोलणार, मग विषय काही का असेना


विसरूनच गेलीस आम्हाला, आज कसे आक्रीत घडले?

मैत्रिणीने केले कौतुक तर आज्जीने लाडीक रागेही भरले


दारी संकट .. कामेही  बिकट.. सर्वांची घरीच नांदी

छंद जोपासले कुणी तर कुणी केली धुणी-भांडी


कोणाशी शाळेच्या गप्पा तर कोणाशी मुला-बाळांच्या

रूटीनच्या ओझ्याखाली गाडल्या गेलेल्या आशा-आकांक्षाच्या

   

दूरावल्या बेटांमधे आठवणींचे पूल बांधू पहातेय

सुख-दुःख-राग-प्रेम-माया सर्वांचीच वाटणी होतेय 


दुसरयांच्या आयुष्यात डोकावण्यात माझाच स्वार्थ दाटला

स्वत:च्या परीघात राहताना, जरा एकटेपणा वाटला


 दुरावल्या भेटीगाठी तरी संवादही नसे उणा

 फोन/ई-मेल/मेसेज करून नुसते ‘Hi’ म्हणा!!!


Disclaimer-कुसुमाग्रजांची नम्र माफी मागून मांडलेले मज पामराचे विचार!!  

5 comments:

Unknown said...

वा धनु, तू तर लेखिका ,कवियत्री सर्वच आहेस.खूप सुंदर!👍👍👌👌

Unknown said...

एकदम मस्त मावशी 🙌 खरं आहे सगळं🤗

Unknown said...

धनु, मस्त 👌👌

Unknown said...

खूपच सुंदर !

rashmialways said...

Sundar..